नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांना घरकुल मिळवण्याची स्वप्न आहेत, आणि त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) फॉर्म भरत आहात. पण फॉर्म भरण्याच्या तारखेत मुदतवाढ झाल्याची बातमी तुम्हाला माहिती आहे का? होय, आता तुम्ही 15 मे 2025 पर्यंत या योजनेचा फॉर्म भरू शकता!
आधी ही तारीख 30 एप्रिल 2025 होती, पण अनेकांना फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. कोणाकडे जॉब कार्ड नव्हत, कोणाच्या कागदपत्रांमध्ये चूक होती, तर कोणाच्या आधार कार्डावर नावाची स्पेलिंग चुकली होती. या सगळ्या समस्यांचा विचार करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
हे वाचल का ? घरबसल्या जॉब कार्ड कस काढायचं? संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत
प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की देशातील प्रत्येक गरीब आणि बेघर कुटुंबाला पक्क घर मिळाव. ही योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी आहे. ग्रामीण भागात या योजनेच नाव आहे “प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G)” आणि शहरी भागात “प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U)”.
या योजनेअंतर्गत सरकार आर्थिक मदत करते, ज्यामुळे गरीब लोकांना त्यांच स्वतःच पक्क घर बांधता येत. ग्रामीण भागात सरकार 1.20 लाख रुपये देते, आणि जर तुम्ही डोंगरी भागात राहत असाल, तर ही रक्कम 1.30 लाख रुपये आहे. शहरी भागात ही रक्कम 2.50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. याशिवाय, ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांना सरकारकडून 50 हजार रुपये अतिरिक्त मदत मिळते.
घरकुल योजना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आधीची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 होती. पण अनेक लोकांना फॉर्म भरताना अडचणी आल्या. काही लोकांकडे जॉब कार्ड नव्हत, जे या योजनेसाठी गरजेच आहे. काहींच्या कागदपत्रांमध्ये चूक होती, तर काहींच्या आधार कार्डावर नावाची स्पेलिंग चुकलेली होती. या सगळ्या समस्यांचा विचार करून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
आता तुम्ही 15 मे 2025 पर्यंत या योजनेचा फॉर्म ऑनलाइन भरू शकता. ही मुदतवाढ ही शेवटची संधी आहे, अस सरकारने स्पष्ट केल आहे. म्हणून जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल, तर ही संधी सोडू नका. ही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे, आणि आता तुम्ही घरबसल्या मोबाइलवरून हा फॉर्म भरू शकता.
हे वाचल का ? घरकुल योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
फॉर्म भरण्याच्या अडचणी आणि त्यावर उपाय
फॉर्म भरताना अनेकांना अडचणी येत आहेत, आणि या अडचणी सोडवण्यासाठी काही उपाय आहेत. या अडचणी आणि त्यावर उपाय आपण पाहूया.
जॉब कार्ड नसण्याची समस्या
प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरताना जॉब कार्ड असण गरजेच आहे. हे जॉब कार्ड तुम्हाला मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत मिळत. पण अनेकांना हे कार्ड मिळालेल नाही. यामुळे त्यांचा फॉर्म भरता येत नाही.
यावर उपाय असा आहे की, तुम्ही तुमच्या गावच्या पंचायत समितीच्या कार्यालयात जा. तिथे तुम्हाला जॉब कार्डसाठी अर्ज करता येईल. जर तुमच्या गावात कर्मचारी कमी असतील, तर तुम्ही गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही समस्या सोडवू शकता.
कागदपत्रांमध्ये चूक असणे
काही लोकांच्या कागदपत्रांमध्ये चूक आहे, जसं की आधार कार्डवर नावाची स्पेलिंग चुकलेली आहे किंवा इतर माहिती चुकीची आहे. अशा वेळी तुम्ही प्रथम तुमच्या आधार कार्डमधील चूक दुरुस्त करा. आधार केंद्रात जाऊन तुम्ही तुमच नाव, पत्ता किंवा इतर माहिती दुरुस्त करू शकता. त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरावा, जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
इतर कागदपत्रांची कमतरता
फॉर्म भरताना तुम्हाला काही कागदपत्रांची गरज असते, जस की आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आणि जॉब कार्ड. जर ही कागदपत्र तुमच्याकडे नसतील, तर प्रथम ती तयार करा. तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीत जाऊन ही कागदपत्रं मिळवू शकता.
फॉर्म भरल्यानंतर घरकुल कधी मिळेल?
फॉर्म भरल्यानंतर लगेच घरकुल मिळत नाही, हे लक्षात ठेवा. ही एक लांब प्रक्रिया आहे, आणि तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुमचा अर्ज पडताळणीसाठी पाठवला जातो. तुमच्या गावातील ग्रामपंचायत, ब्लॉक आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करतात.
हे वाचल का ? घरबसल्या आधार कार्डला बँक खाते कस लिंक करायच? अगदी सोपी प्रक्रिया
पडताळणी प्रक्रियेत तुम्ही दिलेली माहिती खरी आहे की नाही, हे तपासल जात. यासाठी तुमच्या गावातील अधिकारी तुमच्या घरी येऊन भेट देतात. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर तुमच्या पत्त्यावर बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) येऊन तुमची माहिती तपासतात. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष लागू शकत.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमच नाव मंजूर यादीत समाविष्ट केल जात. त्यानंतर तुम्हाला अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने मिळते. सध्या नवीन लाभार्थ्यांना सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे, त्यांना 1.20 लाख रुपये किंवा ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांना 50 हजार रुपये अतिरिक्त मदत मिळेल.
पण घरकुल बांधून पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 वर्षे लागू शकतात. कारण ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते, आणि अनेक लोकांचे अर्ज एकाच वेळी पडताळले जातात. त्यामुळे थोडा संयम ठेवावा लागेल.
घरकुल योजनेच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची?
तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस ऑनलाइन तपासू शकता. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा, म्हणजेच https://pmayg.nic.in/. तिथे “Track Application Status” हा पर्याय निवडा. तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे, तो टाका. त्यानंतर “Submit” बटणावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, तर तुम्हाला पुढील प्रक्रियेची माहिती मिळेल. जर अर्ज नाकारला असेल, तर त्याच कारणही दिसेल, आणि तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता.
घरकुल योजनेचे फायदे
प्रधानमंत्री आवास योजनेचे अनेक फायदे आहेत, या योजनेअंतर्गत तुम्हाला पक्क घर मिळत, ज्याचा आकार किमान 25 चौरस मीटर असतो. यात स्वयंपाकघर आणि इतर मूलभूत सुविधा असतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1.20 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते, जी तुमच्या बँक खात्यात थेट जमा होते. याशिवाय, ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांना 50 हजार रुपये अतिरिक्त मिळतात. तसेच तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांची मदत मिळते. आणि मनरेगाच्या माध्यमातून तुम्हाला 95 दिवसांचा रोजगार मिळतो, ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळत.
प्रधानमंत्री आवास योजना ही गरीब आणि बेघर कुटुंबांसाठी एक वरदान आहे. आता फॉर्म भरण्यासाठी 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे तुम्हाला तुमच स्वप्न पूर्ण करण्याची आणखी एक संधी आहे. तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरला आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.