पहलगाम दहशतवादी हल्ला : हे 57 मुस्लिम देशांचा पाकिस्तानला पाठिंबा !

पहलगाम दहशतवादी हल्ला : हे 57 मुस्लिम देहांचा पाकिस्तानला पाठिंबा !

आज आपण एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडल आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या सुंदर पर्यटनस्थळी 22 एप्रिल 2025 रोजी एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. या हल्ल्यात तब्बल 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी पर्यटकांची धर्मावरून ओळख पटवून त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेजिस्टंट फ्रंट (टीआरएफ) नावाच्या दहशतवादी गटाने घेतली होती, पण नंतर त्यांनी ही जबाबदारी नाकारली.

WhatsApp Group Join Now

या हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानने इस्लामिक सहकार्य संघटना (OIC), म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या 57 मुस्लिम देशांच्या गटाकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या गटाने काश्मीरी जनतेच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाला पाठिंबा देत भारताच्या कारवायांवर चिंता व्यक्त केली आहे. पण भारतानेही याला सडेतोड उत्तर दिल आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि पाहूया की या घटनेमुळे भारत-पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होऊ शकतात.

पहलगाम हल्ल्याची घटना – त्या दिवशी नेमक काय घडल ?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे, जिथे दरवर्षी लाखो पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. पहलगाममधील बैसरन व्हॅली, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखल जात, ही एक अशी जागा आहे जिथे पर्यटक पिकनिकसाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी येतात. पण 22 एप्रिल 2025 रोजी या सुंदर जागेवर रक्तपात झाला. दुपारी 2:50 च्या सुमारास चार ते पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ला केला. त्यांच्याकडे एम-4 कार्बाइन आणि एके-47 सारखी शस्त्र होती, आणि त्यांनी सैन्याच्या गणवेशात येऊन हा हल्ला केला.

या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतांश हिंदू पर्यटक होते, तर एक ख्रिश्चन पर्यटक आणि एक स्थानिक मुस्लिम व्यक्तीचाही समावेश होता. हल्लेखोरांनी पर्यटकांना गोळ्या मारण्यापूर्वी त्यांचे नाव आणि धर्म विचारल्याचा आरोप आहे. काहींना तर कलमा पढायला सांगितल गेल, असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल आहे. या हल्ल्यात 20 हून अधिक जण जखमी झाले, ज्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल. काही गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने श्रीनगरच्या सैन्य रुग्णालयात हलवण्यात आल.

हे वाचल का ? -  Whatsapp वरच्या फोटोमुळे बँक अकाउंट रिकामे ! PhotoScam बद्दल पूर्ण माहिती

या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेजिस्टंट फ्रंट (टीआरएफ) नावाच्या दहशतवादी गटाने घेतली होती. हा गट लश्कर-ए-तैयबाचा एक भाग मानला जातो, जो पाकिस्तानातून कार्यरत आहे. टीआरएफने असा दावा केला की, हा हल्ला जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना स्थायिक होण्यास परवानगी देणाऱ्या भारतीय सरकारच्या धोरणाच्या विरोधात होता. पण चार दिवसांनंतर त्यांनी ही जबाबदारी नाकारली, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले.

पहलगाममधील या भयंकर हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. भारताने या हल्ल्याला तात्काळ प्रतिसाद देत कठोर पावल उचलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्ल्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिल. 23 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची (CCS) एक बैठक झाली, ज्यात पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पहिला निर्णय म्हणजे, भारताने 1960 च्या सिंधु जल कराराला तात्काळ निलंबित केल. हा करार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पाणीवाटपाशी संबंधित होता, आणि या कराराला निलंबित करण हा पाकिस्तानला मोठा धक्का होता. दुसर पाऊल म्हणजे, भारताने अटारी-वाघा सीमा बंद केली, जी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकमेव जमीन मार्ग आहे. तिसर, भारताने सर्व पाकिस्तानी राजनायिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आणि इस्लामाबादमधील भारतीय दूतावास बंद केला. चौथा निर्णय म्हणजे, भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी घातली आणि त्यांचे व्हिसा रद्द केले. आणि पाचवा निर्णय, 30 एप्रिलपासून 23 मे पर्यंत भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपल हवाई क्षेत्र बंद केल, ज्यामुळे पाकिस्तानला मोठ आर्थिक नुकसान झाल.

या कारवायांमुळे पाकिस्तान हादरला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा नावाचा माजी पाकिस्तानी एसएसजी कमांडो असल्याचं उघड केल आहे, जो सध्या लश्कर-ए-तैयबासाठी काम करतो. या हल्ल्यात दोन स्थानिक दहशतवादी, आदिल हुसैन थोकर आणि आसिफ शेख यांचाही समावेश होता, ज्यांच्या घरांवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने बुलडोजर चालवला किंवा त्यांना बॉम्बने उडवून दिलं.

पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय खेळ -57 मुस्लिम देशांचा पाठिंबा

या हल्ल्यानंतर भारताने ज्या पद्धतीने कारवाई केली, त्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारताच्या या कठोर पावलांमुळे दबावात आलेल्या पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानने इस्लामिक सहकार्य संघटना (OIC), म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या 57 मुस्लिम देशांच्या गटाकडून पाठिंबा मिळवण्यासाठी संपर्क साधला. या गटाने एका निवेदनात काश्मीरी जनतेच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाला पाठिंबा दर्शवला आणि जम्मू-काश्मीरमधील भारताच्या कारवायांवर चिंता व्यक्त केली.

हे वाचल का ? -  बापरे ! भारताची युट्यूबर ज्योती मल्होत्रा पुरवत होती पाकिस्तान ला सर्व माहिती ?

पाकिस्तानने असा दावा केला की, भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांच उल्लंघन करत आहे आणि काश्मीरी जनतेच्या हक्कांच दमन करत आहे. पण या दाव्याला काही ठोस पुरावे देण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. OIC च्या या भूमिकेमुळे भारत संतापला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने OIC ला स्पष्ट शब्दांत सांगितल की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, आणि भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणत्याही देशाला किंवा संघटनेला अधिकार नाही. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितल की, “पाकिस्तानचा आतंकवादाला पाठिंबा देण्याचा इतिहास जगाला माहिती आहे. त्यांनी आपली जबाबदारी झटकण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचाचा वापर करण बंद कराव.”

पहलगाम हल्ल्याची आणि त्यानंतरच्या भारत-पाकिस्तान तणावाची जगभरात चर्चा होत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे आणि या हल्ल्यामागील दोषींना, त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांना आणि त्यांचा पाठिंबा देणाऱ्यांना न्यायाच्या कठोरात आणण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनीही भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याच आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितल की, सामान्य नागरिकांना लक्ष्य करणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाऊ शकत नाहीत, आणि या परिस्थितीला शांततेने हाताळण्याची गरज आहे.

अमेरिका, रशिया, इराण आणि इस्रायलसह अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि आतंकवादाविरुद्ध भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवत सांगितलं की, “आतंकवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायल भारताच्या सोबत आहे.” सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनीही भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे. पण OIC च्या 57 मुस्लिम देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दर्शवल्याने या प्रकरणाला नव वळण मिळाल आहे.

पहलगाममधील या हल्ल्याने जम्मू-काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. हल्ल्यानंतर काश्मीरमधील जवळपास 80% पर्यटन बुकिंग्ज रद्द झाली आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यातील 87 पैकी 48 पर्यटनस्थळं तात्पुरती बंद केली आहेत, जेणेकरून सुरक्षा ऑपरेशन्स करता येतील आणि पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री करता येईल.

हे वाचल का ? -  कुणाल कामराच्या व्यंग्यात्मक गाण्यावरून राजकीय वाद: समर्थकांकडून लाखोंची देणगी, शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया

काश्मीरच पर्यटन क्षेत्र हे स्थानिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. 2024-25 मध्ये काश्मीरच्या जीएसडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा 7-8% इतका होता, आणि त्याचं मूल्य 18,500 ते 21,200 कोटी रुपये इतक होत. सरकारने पुढील 4-5 वर्षांत हा वाटा 15% पर्यंत वाढवण्याच लक्ष्य ठेवल होत. पण या हल्ल्यामुळे हे लक्ष्य धोक्यात आल आहे. पर्यटकांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे, आणि अनेकांनी काश्मीरला भेट देण्याच टाळल आहे. स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांचही मोठ नुकसान झाल आहे.

पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. हल्ल्यानंतर भारताने ज्या पद्धतीने कठोर पावलं उचलली, त्यामुळे पाकिस्तान दबावात आला आहे. पण त्याचवेळी, OIC च्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर काही आधार मिळाला आहे. या परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC) सातत्याने शस्त्रसंधीच उल्लंघन केल आहे. पहलगाम हल्ल्यानंतर कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने आपल्या लष्करी तयारीला वेग दिला आहे, आणि भारतीय नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात फायरिंग सराव सुरू केला आहे. या सर्व घडामोडी पाहता, दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अनेक पर्यटक होते, जे आपल्या कुटुंबासह काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. या हल्ल्याने सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. हल्ल्यातील एका पीडितेची पत्नी हिमांशी नरवाल, जी स्वतः एक पीएचडी स्कॉलर आहे, हिने शांततेची अपील केली आहे. ती म्हणाली, “आम्हाला मुस्लिम किंवा काश्मिरी लोकांच्या विरोधात कोणालाही जायचं नाही. आम्हाला फक्त शांति आणि न्याय हवा आहे.”

हैदराबादमध्ये AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ एका मशिदीत काळी पट्टी बांधून प्रार्थना केली. त्यांनी या हल्ल्याला “पाप” म्हटलं आणि इस्लामच्या नावावर अशा कृत्यांचं समर्थन करणाऱ्यांचा निषेध केला. सिंगापूरमधील भारतीय समुदायानेही हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती दर्शवत एका शोकसभेचं आयोजन केलं, ज्यामध्ये 250 हून अधिक लोकांनी भाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment