India Pakistan War सुरू ? भारताचा Rawalpindi सह 9 ठिकाणांवर हल्ला !

India Pakistan War सुरू ? भारताचा Rawalpindi सह 9 ठिकाणांवर हल्ला !

India Pakistan War– नमस्कार मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर भ्याड हल्ले सुरू केले. 7 मे 2025 रोजी रात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (LoC) तोफांचा मारा सुरू केला. या हल्ल्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील पूछ आणि तगधार भागातील गावांना टार्गेट करण्यात आल. या हल्ल्यांमुळे 15 ते 16 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे.

WhatsApp Group Join Now

या हल्ल्यांमुळे सीमावर्ती भागातील गावांवर मोठा परिणाम झाला. अनेक घर उद्ध्वस्त झाली, आणि गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल. या हल्ल्यांमध्ये 43 जण जखमी झाले, ज्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबानी आणि अखनूर या भागात हल्ले केले. भारतीय सैन्याने या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिल, आणि पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. या हल्ल्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली, आणि स्थानिक लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरलेल आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भारतावर हवाई हल्ले करेल, अशी शक्यता भारताने आधीच वर्तवली होती. त्यामुळे भारताने आपली संरक्षण यंत्रणा मजबूत केली होती. भारताने आपली S400 मिसाइल डिफेन्स सिस्टम, ज्याला सुदर्शन चक्र असही म्हणतात, अलर्टवर ठेवली होती. 7 मे 2025 रोजी रात्री पाकिस्तानी सैन्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील 15 ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांसाठी पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर केला.

या हल्ल्यांमध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या 15 ठिकाणी भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी माध्यमांना ही माहिती दिली. पण भारताची S400 मिसाइल डिफेन्स सिस्टमने या हल्ल्यांना हाणून पाडल, आणि पाकिस्तानचा हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी झाला.

S400 मिसाइल डिफेन्स सिस्टम – भारताची ताकद

S400 मिसाइल डिफेन्स सिस्टम ही भारताची एक अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा आहे, ज्याला सुदर्शन चक्र असंही नाव देण्यात आल आहे. ही सिस्टम जगातील सर्वात प्रभावी लांब पल्ल्याच्या मिसाइल डिफेन्स सिस्टमपैकी एक मानली जाते. या सिस्टमची रेंज 40 ते 400 किलोमीटर आहे, आणि ती 360 डिग्रीमध्ये मिसाइल्स शोधू शकते. ही सिस्टम एकाच वेळी 300 लक्ष्यांना ट्रॅक करू शकते.

हे वाचल का ? -  महाराष्ट्र HSC निकाल 2025 : 12 वी बोर्डाचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा ? संपूर्ण माहिती!

ही सिस्टम बॅलिस्टिक मिसाइल्स, क्रूझ मिसाइल्स, स्टेल्थ विमानं आणि लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक शस्त्रांना रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशियामध्ये या S400 मिसाइल तंत्रज्ञानासाठी करार झाला होता. या सिस्टमने पाकिस्तानचे हवाई हल्ले हाणून पाडले, आणि भारताच्या संरक्षण ताकदीचं एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवल.

ही सिस्टम इजराईलच्या आयर्न डोम सिस्टमपेक्षा कितीतरी पटीने प्रगत आहे. आयर्न डोम सिस्टमची रेंज फक्त 70 किलोमीटर आहे, आणि ती कमी पल्ल्याच्या मिसाइल्स रोखण्यासाठी डिझाइन केलेली आहे. पण S400 सिस्टम लांब पल्ल्याच्या आणि जटिल हल्ल्यांना रोखण्यात सक्षम आहे.

भारताचं प्रत्युत्तर- लाहोरमधील हवाई हल्ले

पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडल्यानंतर भारत फक्त थांबला नाही, तर त्याने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. 8 मे 2025 रोजी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आली. विशेषतः लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निकामी करण्यात आली.

भारतीय हवाई दलाने इजराईलच्या हरोप ड्रोनचा वापर करून हे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये लाहोर, गुजरावाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियावाली, कराची, चोर आणि अटक या पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांचा समावेश होता. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या HQ-9 मिसाइल डिफेन्स सिस्टमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल.

ही सिस्टम पाकिस्तानने चीनकडून घेतली होती, आणि ती हल्ले शोधण्यासाठी महत्त्वाची होती. पण भारताच्या हल्ल्यांमुळे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यांमुळे रावळपिंडीतील एका क्रिकेट स्टेडियमचंही नुकसान झालं, जिथे 8 मे रोजी संध्याकाळी पाकिस्तान सुपर लीगची मॅच होणार होती. पण भारताच्या हल्ल्यांमुळे हे स्टेडियम ढिगाऱ्याखाली गेल.

लाहोरमधील स्फोट – भारताच्या हल्ल्यांचा परिणाम

8 मे 2025 रोजी सकाळी लाहोर शहरात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. लाहोरमधील वाल्टन विमानतळ, गोपालनगर आणि नसराबाद भागात हे स्फोट झाले. सुरुवातीला या स्फोटांच कारण समजल नव्हत, पण नंतर ही माहिती समोर आली की, हे स्फोट भारताच्या हवाई हल्ल्यांचा भाग होते. भारतीय हवाई दलाने ड्रोनच्या मदतीने हे हल्ले केले, आणि लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली.

हे वाचल का ? -  रशिया-युक्रेन च्या संघर्षामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाढतेय?

या हल्ल्यांमुळे लाहोर शहरात भीतीच वातावरण पसरल. रावळपिंडी हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जवळ आहे, आणि भारताने रावळपिंडीवरही हल्ला करून पाकिस्तानला थेट इशारा दिला. या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होईल का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

पाकिस्तानची HQ-9 सिस्टम – अपयशाची कहाणी

पाकिस्तानकडे असलेली HQ-9 ही एक मिसाइल डिफेन्स सिस्टम होती, जी त्यांनी चीनकडून घेतली होती. ही सिस्टम चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने विकसित केली होती. 2021 मध्ये पाकिस्तानने ही सिस्टम आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती. ही सिस्टम शत्रूची विमानं, क्रूझ मिसाइल्स, मानवरहित विमानं आणि टॅक्टिकल बॅलिस्टिक मिसाइल्स रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती.

चीनकडे या सिस्टमचं HQ-9B हे प्रगत व्हर्जन आहे, ज्याची रेंज 250 ते 260 किलोमीटर आहे. पण चीनने पाकिस्तानला या सिस्टमचं बेसिक व्हर्जन दिलं, ज्याची रेंज फक्त 125 किलोमीटर होती. भारताच्या हवाई हल्ल्यांपुढे ही सिस्टम पूर्णपणे अपयशी ठरली, आणि भारताने ती उद्ध्वस्त केली. या घटनेमुळे पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेची कमकुवत बाजू जगासमोर आली.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया – अमेरिका आणि चीनचं मत

या तणावामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानेही या परिस्थितीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अमेरिकेने आपल्या नागरिकांना आणि लाहोरमधील दूतावासातील कर्मचाऱ्यांना हाय अलर्टचे निर्देश दिले. अमेरिकेने लाहोरमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत भारत आणि पाकिस्तान यांना संयम राखण्याच आवाहन केल.

दुसरीकडे, चीननेही या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, ते कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतात. पण त्याचबरोबर त्यांनी या संघर्षात आपण तटस्थ राहणार असल्याचं स्पष्ट केल. या सर्व प्रतिक्रियांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.

हे वाचल का ? -  महाराष्ट्र हवामान अंदाज: मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट?

ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या हल्ल्यांमधून भारताने जगाला एक संदेश दिला आहे. भारताने आपली कारवाई फक्त दहशतवादी तळांवर आणि संरक्षण यंत्रणांवर केंद्रित ठेवली, आणि सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवली नाही. या कारवाईतून भारताने आपला संयम आणि आपली ताकद दोन्ही दाखवली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, भारताच्या हल्ल्यांमुळे कोणत्याही निष्पाप व्यक्तीला हानी पोहोचलेली नाही. ही कारवाई पूर्णपणे नियोजनबद्ध आणि अचूक होती. भारताने S400 मिसाइल डिफेन्स सिस्टम आणि हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून आपली तंत्रज्ञानातील प्रगती आणि लष्करी ताकद जगासमोर ठेवली. या कारवाईमुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.

India Pakistan War ची चाहूल?

ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव खूप वाढला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या S400 मिसाइल डिफेन्स सिस्टमने तो हाणून पाडला. इतकंच नाही, तर भारताने थेट पाकिस्तानात घुसून लाहोरसह अनेक शहरांमध्ये हल्ले करून आपली ताकद दाखवली. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होईल का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, ही कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध आणि संरक्षणासाठी होती. शेवटी, आपण एवढंच म्हणू शकतो की, भारत हा शांततेचा पुरस्कार करणारा देश आहे, पण आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तो कठोर पावलं उचलण्यास मागे हटत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment