गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्या नात्यात दुरावा? पुरस्कार सोहळ्यातील प्रतिक्रियेमुळे सगळेच पडले विचारात !

गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्या नात्यात दुरावा? पुरस्कार सोहळ्यातील प्रतिक्रियेमुळे सगळेच पडले विचारात !

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा यांच्यात मतभेद?

बॉलीवूडचा ‘हीरो नंबर 1’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा यांच्या नात्यात तणाव आहे का? याविषयी सध्यस्थित सगळीकडेच चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनिता आहुजा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या चर्चांना आणखी बढती मिळालेली आहे. या कार्यक्रमात जेव्हा सुनिता आहुजा यांना विचारण्यात आले की गोविंदा कुठे आहेत? तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होत “कोण गोविंदा?” असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरामुळे गोविंदाचे चाहते चकित झाले असून, त्यांच्या वैवाहिक नात्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

WhatsApp Group Join Now

सोशल मीडियावरील काही ट्रेंडिंग कमेंट्स:

“आपण ज्या व्यक्तीमुळे प्रसिद्ध झालो, त्याच व्यक्तीला नाकारायचे? हे योग्य आहे का?”
“हा व्हिडिओ बघून गोविंदा काय विचार करत असतील?”
“सुनिता यांनी हे उत्तर विनोदाने दिले असावे.”

सुनिता आहुजा यांची धक्कादायक प्रतिक्रिया – खरोखर काहीतरी बिघडले आहे का?

जेव्हा पुरस्कार सोहळ्यात सुनिता आहुजा यांना “गोविंदा सर कुठे आहेत?” असे विचारण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले आणि त्यांनी “कोण गोविंदा?” असे उत्तर दिले.

💬 हे उत्तर दोन प्रकारे समजले जात आहे:
1️⃣ मजेत दिलेले उत्तर: काहींना वाटते की, सुनिता यांनी हे उत्तर सहज आणि मजेत दिले असेल. कारण सुनीता आहुजा यांचा स्वभाव थोडा विनोदी आहे.
2️⃣ संकेत काहीतरी गंभीर आहे: काही चाहत्यांना असे वाटते की, हे उत्तर सुचवत आहे की दोघांमध्ये काहीतरी बिनसले आहे. आणि सुनीता आहुजा यांनी दिलेले उत्तर कोण गोविंदा? हे रागाने दिलेले उत्तर सुद्धा असू शकते असा सुद्धा अंदाज चाहते लावत आहे.

📢 हे प्रकरण एवढे गाजले की, बॉलीवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनीही यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.


सोशल मीडियावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

🔹 अनेकांनी सुनिता आहुजा यांच्यावर टीका केली आहे की, “ज्यांनी तुमच्यासाठी सर्वकाही केले, त्यांच्याविषयी असे बोलणे योग्य नाही. सुनीता आहुजा ने असे उत्तर द्यायला पाहिजे नव्हते असे चाहत्यांचे मत आहे.”
🔹 काहींना वाटते की, “हे फक्त एका कार्यक्रमातील विनोद होता, त्यावरून इतका मोठा वाद निर्माण होण्याची काहीही गरज नाही, असे सुद्धा काही चाहत्यांचे मत आहे.”
🔹 तर काहींनी “गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्यात दुरावा आला आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण सुनिता ने दिलेले उत्तर हे विचारात पडण्यासारखे आहे. त्यामुळे काही चाहत्यांना वाटत आहे की, सुनिता आणि गोविंदा यांच्यात काहीतरी मोठा वाद झालेला आहे.

हे वाचल का ? -  National Crush Rashmika Birthday Special: 'कोडागु' ते 'कॉफी विथ करण' चा प्रवास

गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्यातील महत्त्वाचे टप्पे

  • सुरुवातीची प्रेमकहाणी: गोविंदा आणि सुनिता आहुजा यांचे प्रेम विवाह

बॉलीवूडच्या इतिहासात अनेक प्रेमकहाण्या गाजल्या आहेत, पण गोविंदा आणि सुनिता आहुजा यांचे नाते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. कारण या जोडप्याने केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही प्रेम, समर्पण आणि संघर्षाचे सुंदर उदाहरण संगळ्यांसामोर सादर केलेले आहे.


  • पहिली भेट आणि प्रेमाचा प्रारंभ

गोविंदा आणि सुनिता आहुजा यांची प्रेमकहाणी अगदी चित्रपटासारखीच आहे.

📌 पहिली भेट:
गोविंदा आणि सुनिता यांची भेट 1980 च्या दशकात झाली होती.
➡ सुनिता या त्यावेळी किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या काकूंच्या ओळखीमुळे दोघे पहिल्यांदा भेटले.
➡ दोघांमध्ये लगेच मैत्री झाली, आणि त्या मैत्रीचे रूपांतरण नंतर प्रेमात झाले.

📌 प्रेमाचा प्रारंभ:
गोविंदा त्यावेळी बॉलीवूडमध्ये संघर्ष करत होते, तर सुनिता एका उच्चभ्रू कुटुंबातून आल्या होत्या.
➡ सुनिता यांच्या बोलण्याच्या स्टाईलने आणि सुनीताच्या मोकळ्या स्वभावाने गोविंदा अतिशय प्रभावित झाले.
➡ दोघांनी काही दिवसांतच एकमेकांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली आणि त्या दोघांचे प्रेम फुलू लागले.

💬 गोविंदा एका मुलाखतीत म्हणाले होते –

“मी आणि सुनिता पूर्णपणे वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलो होतो, पण तिचे मन जिंकण्यासाठी मला फार वेळ लागला नाही.”


  • प्रेमासाठी संघर्ष आणि कुटुंबाची नाराजी

🎭 सुनिता एका संपन्न आणि परिपूर्ण पंजाबी कुटुंबातील होत्या, तर गोविंदा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.
सुनिता यांच्या घरच्यांना गोविंदासोबत असलेले त्यांचे नाते मुळीच मान्य नव्हते.
त्यांच्या घरातील लोकांना वाटत होते की, गोविंदा एक स्ट्रगलिंग अभिनेता आहे, त्याच्या करिअर बाबत सध्या काहीही बोलू शकत नाही त्यामुळे त्यांच्या मुलीसाठी तो योग्य नाही.
➡ पण, सुनिता यांनी आपल्या प्रेमासाठी कुटुंबाच्या इच्छेच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला.

📌 त्यांच्यातील प्रेम एवढे गहिरे होते की, दोघांनी पळून जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला.
📌 1987 साली सुनीता आणि गोविंदा या दोघांनी सगळ्यांच्या गुपचूप लग्न केले, जे बराच काळ सगळ्यांपासून लपवून ठेवले होते.

हे वाचल का ? -  निकोल किडमनचा ‘हॉलंड’ चित्रपट: उत्कृष्ट अभिनयासह थ्रिलरचा अनुभव

  • लग्नाचा गुपित ठेवलेला निर्णय

गोविंदा यांचे चित्रपटातील करिअर नुकतेच सुरु झाले होते आणि त्यांना वाटत होते की, जर त्यांनी त्यांच्या आणि सुनिताच्या लग्नाची बातमी जाहीर केली तर त्यांच्या फॅन-फॉलोइंगवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गोविंदा आणि सुनिता यांनी लग्नाच्या गोष्टी काही वर्षे गुपित ठेवायचे ठरवले. त्यानंतर चार वर्षांनी 1991 मध्ये हे लग्न अधिकृतरीत्या संगळ्यांसमोर उघड झाले. गोविंदा यांच्या फॅन्सना जेव्हा हे समजले, तेव्हा अनेक जण आश्चर्यचकित झाले होते!

एका मुलाखतीत गोविंदा यांनी कबूल केले होते की –
“माझ्या करिअरच्या सुरुवातीला लग्नाची घोषणा केली असती, तर कदाचित माझ्या करिअर च्या सुरवातीलाच मला फटका बसला असता. आणि माझ्या फॅन-फॉलोइंग वर त्याचा मोठा परिणाम झाला असता.”


  • प्रेमाचा आधार: वैवाहिक जीवनातील संघर्ष आणि यश

गोविंदा 90च्या दशकात बॉलीवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार बनले. त्या काळात त्यांचे अनेक प्रसिद्ध चित्रपट आले – कुली नंबर 1″, “हीरो नंबर 1”, “हसीना मान जाएगी”, “साजन चले ससुराल” आणि बरेच काही. त्यांना त्यावेळी इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या अभिनेत्रींशी लिंकअप करण्याच्या बातम्या सुद्धा येऊ लागल्या होत्या. मात्र अश्या कठीण वेळी सुनीताने गोविंदाला खूप साथ दिली.गोविंदाच्या लोकप्रियतेमुळे नाते तणावपूर्ण झाले तरीही, सुनिता यांनी कुटुंब आणि नाते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले.


  • गोविंदा यांच्या वैवाहिक जीवनातील आव्हाने आणि गैरसमज

गोविंदा आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यात अफेअर आहे याबाबत खूप चर्चा त्या काळात जोरदार होत्या. आणि त्यामुळे सुनिता यांनी काही काळासाठी गोविंदा पासून दूर जाण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. मात्र गोविंदानी हा वाद सोडवला आणि दोघे पुन्हा एकत्र आले.

🎙️ सुनिता यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की –
“लग्न हे फक्त प्रेमावर नव्हे, तर विश्वासावर टिकते. काहीवेळा वाद होतात, पण त्यातून मार्ग नक्की काढला जातो.”


  • कुटुंब आणि मुलांसोबत आनंदी जीवन

गोविंदा आणि सुनिता यांना दोन मुले आहेत – टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा. त्यांच्या मुलीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर त्यांचा मुलगा चित्रपट निर्मिती क्षेत्रात आहे. गोविंदा त्यांच्या मुलांच्या करिअरबाबत खूप गंभीर आहेत आणि त्यांना इंडस्ट्रीत चांगले स्थान मिळावे यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.


  • सध्याच्या काळात त्यांचे सुनीता आणि गोविंदा चे नाते कसे आहे?
हे वाचल का ? -  उर्वशी रौतेलाचा धक्कादायक दावा: बद्रीनाथजवळ माझ्या नावाने आहे मंदिर, साउथमध्येही माझे मंदिर बनवावे!

मागील काही महिन्यांपासून दोघे फारसे एकत्र दिसले नाहीत. अनेकांना वाटते की, त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. तसेच सोशल मीडियावरही ते एकमेकांविषयी फारसे पोस्ट करत नाहीत. परंतु अध्यापपर्यन्त, त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, त्यामुळे त्यांचे नाते अजूनही टिकून आहे असेच मानले जाते.


आणखी वाचा :- निकोल किडमनचा ‘हॉलंड’ चित्रपट: उत्कृष्ट अभिनयासह थ्रिलरचा अनुभव

गोविंदा आणि सुनिता यांचे प्रेम अद्याप टिकून आहे का?

गोविंदा आणि सुनिता यांची प्रेमकहाणी ही संघर्ष आणि त्यागाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून आपले नाते टिकवले आहे. सध्याच्या चर्चांवरून काही जणांना वाटते की, त्यांच्या नात्यात काही तणाव आहे, पण त्यांच्या अधिकृत वक्तव्याशिवाय काहीही निश्चित सांगता येत नाही. करिअरमधील चढ-उतारानंतरही सुनिता आहुजा त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. काही वर्षांपूर्वी सुनिता आणि गोविंदा यांचे कौटुंबिक मतभेद समोर आले होते, परंतु सर्व मतभेद त्यांनी सोडवले होते. मागील काही महिन्यांपासून दोघेही एकत्र फारसे दिसत नाहीत.सोशल मीडियावरही दोघांनी एकमेकांविषयी काही विशेष पोस्ट केले नाहीत. अनेकांना वाटते की, यामागे काहीतरी कारण असणार आहे.


दोघांमधील नाते तुटण्याचे काय कारण असू शकते?

1️⃣ करिअरमधील फरक: गोविंदा आता फारसे चित्रपट करत नाहीत, पण सुनिता सामाजिक कार्यक्रमात सक्रिय असतात.

2️⃣ कौटुंबिक वाद: गोविंदा यांचे त्यांच्या भाची कृष्णा अभिषेक सोबत वाद होते, त्यामुळे कुटुंबात तणाव होता.

3️⃣ वैयक्तिक मतभेद: अनेक जोडप्यांमध्ये काळानुसार मतभेद होतात, पण गोविंदा आणि सुनिता यांच्या बाबतीत काय घडत आहे, हे स्पष्ट नाही.


चाहत्यांचे विश्लेषण – दोघांच्या नात्यात खरंच काहीतरी बिनसले आहे का?

काही लोकांच्या मते, सुनिता यांनी गोविंदाची उपस्थिती टाळण्यासाठीच असे उत्तर दिले असावे. काही चाहत्यांनी सांगितले की “गोविंदा आता फारसा चर्चेत नाही, त्यामुळे सुनिता यांना त्यांचा विषय काढायचा नव्हता.” या प्रतिक्रियेने स्पष्ट होते की, त्यांच्या नात्यात काहीतरी तणाव आहे.


गोविंदा यांची अधिकृत प्रतिक्रिया कधी येणार?

आतापर्यंत गोविंदा यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, चाहते त्यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. सगळ्यांना प्रश्न हा आहे की, गोविंदा यांनी यावर स्पष्टीकरण दिले की, ही अफवा आहे? आणि गोविंद का यावर गप्प राहतील? याबाबत अधिकृत रित्या काही प्रतिक्रिया आल्यानंतर खरे काय आहे ते समजेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment