India Pakistan War – ८ मेच्या रात्री नेमक काय घडलं ? जाणून घ्या सविस्तर माहिती

India Pakistan War - ८ मेच्या रात्री नेमक काय घडलं ? जाणून घ्या सविस्तर माहिती

India Pakistan War – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर या तणावाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. ऑपरेशन सिंदूर ही भारताने दहशतवादाविरुद्ध केलेली एक मोठी कारवाई होती, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

WhatsApp Group Join Now

पण या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या भागांवर ड्रोन आणि मिसाइल्सद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, पण भारताच्या S400 एअर डिफेन्स सिस्टमने हे हल्ले हाणून पाडले. इतकंच नाही, तर भारताने पाकिस्तानच्या 50 हून अधिक ड्रोन नष्ट केले आणि लाहोर, कराची आणि अगदी इस्लामाबादपर्यंत हल्ले करून आपली ताकद दाखवली. या सगळ्या घडामोडींमुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे.

जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानवर पाकिस्तानचे ड्रोन हल्ले

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 8 मे 2025 रोजी रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थान या भागांवर ड्रोन आणि मिसाइल्सद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांमध्ये जम्मू एअरपोर्ट, जम्मू युनिव्हर्सिटी, अखनूर, उधमपूर, पठाणकोट, सतवारी, सांबा, आर.एस. पुरा, कठुआ, राजौरी, अमृतसर, कटरा, जालंधर, जैसलमेर आणि बिकानेर या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल.

पाकिस्तानने या हल्ल्यांसाठी ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर केला, ज्यामुळे भारतीय लष्करी तळांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या हल्ल्यांमुळे सीमावर्ती भागातील गावांमध्ये भीतीच वातावरण पसरल. काही स्थानिकांनी आकाशात ड्रोन आणि मिसाइल्स पाहिल्याचा दावा केला, आणि त्यांनी तातडीने लष्कराला याची माहिती दिली. पण भारताची S400 एअर डिफेन्स सिस्टम अलर्टवर होती, आणि तिने या हल्ल्यांना हाणून पाडल

भारताची S400 एअर डिफेन्स सिस्टम ही जगातील सर्वात प्रगत मिसाइल डिफेन्स सिस्टमपैकी एक आहे. या सिस्टमला सुदर्शन चक्र असंही नाव देण्यात आल आहे. या सिस्टमची रेंज 40 ते 400 किलोमीटर आहे, आणि ती 360 डिग्रीमध्ये मिसाइल्स शोधू शकते. ही सिस्टम एकाच वेळी 300 लक्ष्यांना ट्रॅक करू शकते. ही सिस्टम बॅलिस्टिक मिसाइल्स, क्रूझ मिसाइल्स, स्टेल्थ विमानं आणि लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक शस्त्रांना रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

हे वाचल का ? -  रशिया-युक्रेन च्या संघर्षामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाढतेय?

ऑक्टोबर 2018 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशियामध्ये या S400 मिसाइल तंत्रज्ञानासाठी करार झाला होता. या सिस्टमने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइल्स हवेतच नष्ट केले, आणि भारताच्या संरक्षण ताकदीच एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवल. या सिस्टमने पाकिस्तानचे तब्बल 50 हून अधिक ड्रोन नष्ट केले, आणि भारताच्या लष्करी तळांना कोणतीही हानी पोहोचू दिली नाही.

भारताने केले लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत हल्ले

पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानात घुसून हल्ले केले. 9 मे 2025 रोजी भारतीय हवाई दलाने लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत हल्ले करून आपली ताकद दाखवली. या हल्ल्यांमध्ये भारतीय हवाई दलाने ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर केला, आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली.

लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निकामी करण्यात आली, आणि कराची बंदरावर भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांतने हल्ला केला. विशेष म्हणजे, इस्लामाबादमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली.

इस्लामाबाद हे पाकिस्तानचं राजधानी असलेलं शहर आहे, आणि भारताने तिथे हल्ला करून पाकिस्तानला थेट इशारा दिला. या हल्ल्यांमुळे रावळपिंडीतील क्रिकेट स्टेडियमचंही नुकसान झालं, जिथे पाकिस्तान सुपर लीगच्या मॅचेस होणार होत्या. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानला आपल्या मॅचेस दुसऱ्या ठिकाणी हलवाव्या लागल्या.

हे वाचल का ? -  25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास ! Operation Sindhoor ची पूर्ण कहाणी

पाकिस्तानच्या हल्ल्यांनंतर भारताने आपल्या सुरक्षेत मोठी वाढ केली. राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसर रिकामा करण्यात आला, आणि दिल्ली पोलिसांनी तिथे बंदोबस्त वाढवला. दिल्लीसह जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या सीमावर्ती राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. सीमेजवळील विमानतळ, जस की श्रीनगर, जम्मू, अमृतसर आणि जैसलमेर, तात्पुरते बंद करण्यात आले.

याशिवाय, लष्करी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या, आणि सर्वांना ड्युटीवर बोलावण्यात आल. ताजमहालाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. 1971 च्या युद्धादरम्यान ताजमहाल झाकण्यात आला होता, आणि यावेळीही त्याच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय करण्यात आले. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका तातडीच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला, आणि राज्यात हाय अलर्ट जारी केला. या सर्व उपायांमुळे भारताने आपली तयारी दाखवली, आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याच स्पष्ट केल.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC) सातत्याने गोळीबार सुरू ठेवला. या गोळीबारामुळे सीमावर्ती भागात तणाव वाढला. भारतानेही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं, आणि पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. या तणावामुळे भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट लागू केला. म्हणजेच, रात्रीच्या वेळी लाइट्स, मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, ज्यामुळे शत्रूला कोणतीही माहिती मिळू नये.

या उपायांमुळे सीमावर्ती भागातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल, आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली. या तणावामुळे जम्मू-काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली, आणि स्थानिक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला.

पाकिस्तानची दुटप्पी भूमिका या तणावात स्पष्टपणे दिसून आली. एकीकडे पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, आणि त्यांचे तळ त्यांच्या देशातच प्रशिक्षण देत आहेत. दुसरीकडे, ते असं म्हणतात की, दहशतवादाचा सर्वात जास्त त्रास त्यांनाच होतो आहे. जर भारताने त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तर त्यांनी भारताचं आभार मानायला हव. पण त्याऐवजी ते भारतावर हल्ले करत आहेत.

पाकिस्तानच्या माहितीमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरवर हल्ला केल्याचा इन्कार केला, पण भारताने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील सतवारी, सांबा, आर.एस. पुरा, अर्निया आणि राजस्थानमधील जैसलमेर, बिकानेर या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने हे हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानचा हा दुटप्पीपणा त्यांना अजून खोल खड्ड्यात घेऊन जाणारा आहे.या तणावामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानेही या परिस्थितीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली.

हे वाचल का ? -  महाराष्ट्रात आज होणार जोरदार पाऊस ! मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांनी भारत आणि पाकिस्तान यांना संयम राखण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की, दोन्ही देशांनी बसून हा प्रश्न सोडवावा. याशिवाय, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबेरो यांनीही या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावेत, असं सांगितल. या तणावादरम्यान एक अफवा अशीही पसरली की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अटक करण्यात आली आहे, आणि त्यांची जागा जनरल साहीर शमशाद मिर्झा यांनी घेतली आहे. असा आरोप होता की, जनरल मुनीर यांनी या युद्धाचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. पण या बातमीची अद्याप पुष्टी झालेली नाही, आणि ती खरी आहे की खोटी, हे स्पष्ट झालेल नाही.

या तणावामुळे भारतातही अनेक सुरक्षा उपाय करण्यात आले. 8 मे 2025 रोजी भारतात आयपीएलची एक मॅच सुरू होती, पण ती अर्ध्यावर बंद करण्यात आली. मैदान रिकाम करण्यात आल, आणि खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल. दुसरीकडे, पाकिस्ताननेही आपल्या पीएसएल मॅचेस दुसऱ्या ठिकाणी हलवल्या, कारण रावळपिंडीतील स्टेडियम भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालं होत. या तणावामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये खेळांवर परिणाम झाला, आणि सर्वत्र भीतीचं वातावरण पसरल आहे. भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याच दाखवून दिल.

ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव खूप वाढला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या S400 एअर डिफेन्स सिस्टमने तो हाणून पाडला. इतकंच नाही, तर भारताने लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत हल्ले करून आपली ताकद दाखवली. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानात खळबळ माजली, आणि त्यांची युद्धाची खुमखुमी जिरली.

भारताने आपली कारवाई फक्त संरक्षण आणि दहशतवादाविरुद्ध केंद्रित ठेवली, आणि सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवली नाही. या कारवाईतून भारताने आपला संयम आणि आपली ताकद दोन्ही दाखवली. शेवटी, आपण एवढंच म्हणू शकतो की, भारत हा शांततेचा पुरस्कार करणारा देश आहे, पण आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तो कठोर पावलं उचलण्यास मागे हटत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment