काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी iPhone बाबत मोठ विधान केल, ज्याने भारतात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी Apple कंपनीचे सीईओ टिम कूक यांना स्पष्टपणे सांगितल की, Apple ने भारतात कारखाने उभारू नयेत. “मला भारतात काही नको आहे,” अस ट्रम्प म्हणाले. या विधानानंतर भारतातील नागरिकांनी सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी याला ट्रम्प यांचा भारताविरोधी दृष्टिकोन असल्याच म्हटल आहे. पण मित्रांनो, जर Apple ने खरंच भारतातून माघार घेतली, तर नुकसान कोणाच होईल? भारताच की Apple कंपनीच? याबाबत आपण सविस्तर आढावा घेणार आहोत.
डोनाल्ड ट्रम्प यांच विधान – काय म्हणाले नेमक?
डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारमधील दोहा येथे एका कार्यक्रमात बोलताना Apple चे सीईओ टिम कूक यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला. ते म्हणाले..
मी काल टिम कूक यांच्याशी बोललो. मी त्यांना सांगितल, टिम, आम्ही तुमच्याशी खूप चांगल वागतोय. तुम्ही 500 अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, पण आता मी ऐकतोय की तुम्ही भारतात कारखाने बांधत आहात. मला भारतात काही नको आहे. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगल काम करत आहेत. आम्हाला तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारावेत अस वाटत.
Donald Trump
45th and 47th U.S. President
ट्रम्प यांच हे विधान भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी एक मोठ आव्हान ठरू शकत. कारण Apple सध्या भारतात मोठ्या प्रमाणात iPhone च उत्पादन करत आहे, आणि या उत्पादनाचा फायदा भारताला आणि Apple दोघांनाही होत आहे. पण ट्रम्प यांचा हा सल्ला Apple साठी आणि भारतासाठी काय परिणाम घडवून आणेल?
हे वाचल का ? – 18 हजार कोटींची कंपनी फक्त 74 रुपयांना कशी विकली गेली? बी. आर. शेट्टींची धक्कादायक कहाणी!
Apple साठी भारत का आहे महत्त्वाचा?
Apple साठी भारत आज एक महत्त्वाचा देश बनला आहे. फक्त उत्पादनासाठीच नाही, तर एक मोठी बाजारपेठ म्हणूनही. भारतात Apple दरवर्षी सुमारे 1.83 लाख कोटी रुपयांचे iPhones तयार करत आहे. हे iPhones फक्त भारतातच विकले जात नाहीत, तर अमेरिका, युरोप आणि मध्य आशियासह अनेक देशांमध्ये निर्यात केले जात आहेत.
भारतात iPhone बनवण्याची किंमत आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी Apple साठी फायदेशीर आहेत. भारतात कुशल कामगार आणि कमी खर्चात उत्पादनाची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे Apple ला फायदा होतो. माझ्या एका मित्राने सांगितल की, त्याने नुकताच भारतात बनवलेला iPhone घेतला, आणि त्याला त्याची किंमत आणि गुणवत्ता दोन्ही आवडली. जर Apple ने भारतातून माघार घेतली, तर त्यांना हा फायदा गमवावा लागेल.
भारतात Apple ची गुंतवणूक – टाटा आणि फॉक्सकॉनचा सहभाग
Apple ने भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. टाटा ग्रुप, फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन यांसारख्या कंपन्यांनी भारतात आयफोन उत्पादनासाठी कोट्यवधी डॉलर्सचा पसारा उभा केला आहे. भारतातील बहुतेक iPhone दक्षिण भारतातील फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या कारखान्यात तयार होतात. टाटा ग्रुपनेही Wistron चा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे आणि पेगाट्रॉनच्या ऑपरेशन्स चालवत आहे.
मार्च 2024 पर्यंतच्या 12 महिन्यांत Apple ने भारतात सुमारे 22 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.83 लाख कोटी रुपये) किमतीचे iPhones तयार केले, ज्यात 60% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, भारत आता Apple साठी एक बॅकअप प्लॅन नाही, तर मुख्य योजना बनला आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांना हे सगळ अमेरिकेत हव आहे.
अमेरिकेत iPhone च उत्पादन करण Apple साठी फायदेशीर आहे का?
डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं की, Apple ने सगळ उत्पादन अमेरिकेत कराव. पण हे Apple साठी फायदेशीर आहे का? मुळीच नाही! अमेरिकेत उत्पादन करण म्हणजे Apple चा खर्च दुप्पट होणार आहे. तिथे कामगारांचा पगार भारताच्या तुलनेत चार पटीने जास्त आहे. त्यामुळे iPhone बनवण्याचा खर्च वाढेल, आणि शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचताना त्याची किंमतही वाढेल.
भारतामध्ये भरपूर लोकांना iPhone खूप आवडतो, पण जर त्याची किंमत खूप जास्त झाली, तर लोक दुसरा पर्याय शोधतील. जर iPhone ची किंमत वाढली, तर ग्राहक म्हणतील, “एवढा महाग फोन नकोच!” मग Apple ची विक्री कमी होईल, आणि नुकसान कोणाच होईल? याबाबत तुम्हाला आता सांगायच कामच नाही!
भारताच बाजारपेठ – Apple साठी एक मोठी संधी
भारत ही Apple साठी फक्त उत्पादनाची जागा नाही, तर एक मोठी बाजारपेठही आहे. भारतात लाखो ग्राहक Premium iPhone खरेदी करत आहेत. Apple ने भारतात स्वतःची स्टोअर्स, सर्व्हिस सेंटर्स आणि वितरण व्यवस्था उभी केली आहे. भारतातील ग्राहकांना iPhone ची किंमत आणि गुणवत्ता दोन्ही आवडते. जर Apple ने भारतातून माघार घेतली, तर भारत सरकार अशा उत्पादनांवर निर्बंध लावू शकते. मग आयफोन भारतात विकले iPhones नाहीत, आणि याचा फटका कोणाला बसेल? भारताला नाही, तर Apple ला! कारण भारत ही आता Apple साठी एक गरज बनली आहे, फक्त पर्याय नाही.
ट्रम्प यांच राजकारण आणि Apple चा व्यवसाय
डोनाल्ड ट्रम्प यांच हे विधान म्हणजे निवडणुकीच राजकारण आहे. त्यांना “America First”चा नारा द्यायचा आहे, आणि त्यासाठी ते Apple ला भारतातून माघार घ्यायला सांगत आहेत. पण खर सांगायच तर, ट्रम्प यांच्या या वक्तव्याला फारस गांभीर्याने घ्यायची गरज नाही. कारण जर एखाद्या जागतिक कंपनीने राजकारणाच्या इशाऱ्याला व्यवसायाच्या निर्णयांवर लागू केल, तर तो मूर्खपणा ठरेल. कारण भारत आता कोणत्याही कंपनीसाठी पर्याय राहिलेला नाही, तर एक प्रोडक्शन पॉवरहाऊस आणि विक्रमी बाजारपेठ आहे.
जर Apple ने भारत सोडला, तर नुकसान कोणाच?
जर Apple ने भारतातून माघार घेतली, तर नुकसान भारताच होईल का? नाही! खर नुकसान Apple कंपनीच होईल. कारण भारतातून माघार घेतल्याने Apple चा उत्पादन खर्च वाढेल, विक्री कमी होईल आणि बाजारपेठ गमवावी लागेल. भारतात Apple चे कारखाने बंद झाले, तर टाटा आणि फॉक्सकॉन यांसारख्या कंपन्यांचही नुकसान होईल, पण भारताला दुसरे पर्याय उपलब्ध आहेत. भारतात अनेक कंपन्या उत्पादनासाठी येऊ इच्छितात, कारण इथे कुशल कामगार आणि कमी खर्चात उत्पादनाची सुविधा आहे. पण Apple साठी भारतासारखी जागा पुन्हा मिळण कठीण आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा सल्ला Apple ला खड्ड्यात ढकलण्याचा एक इशारा आहे.
भारतीयांची प्रतिक्रिया – सोशल मीडियावर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानानंतर भारतीयांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे. अनेकांनी ट्रम्प यांचा हा दृष्टिकोन भारताविरोधी असल्याच म्हटल आहे. एका व्यक्तीने लिहिल, “ट्रम्प स्वतः भारतात रियल एस्टेट व्यवसाय करतात, आणि आता भारताच्या प्रगतीला अडवायला निघाले आहेत.”
दुसऱ्या व्यक्तीने लिहिल, “Apple ने भारतात कारखाने उभारले, तर भारताला फायदा होतो, आणि आता ट्रम्प यांना हे सहन होत नाही.” या प्रतिक्रियांवरून भारतीयांची नाराजी स्पष्ट दिसते. पण मित्रांनो, Apple ने याबाबत स्पष्ट केल आहे की, त्यांच्या भारतातील गुंतवणूक योजना कायम राहतील. म्हणजेच, ट्रम्प यांच्या सल्ल्याचा Apple वर फारसा परिणाम होणार नाही.
Apple ची भूमिका – भारताला पाठिंबा कायम
Apple ने ट्रम्प यांच्या विधानानंतर भारत सरकारला आश्वासन दिल आहे की, त्यांच्या भारतातील गुंतवणूक योजना अबाधित राहतील. Apple च्या एका अधिकाऱ्याने सांगितल, “भारत आमच्या जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि आम्ही भारताला एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून पाहतो.” म्हणजेच, Apple ला भारताच महत्त्व समजल आहे, आणि ते ट्रम्प यांच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत.
भारत ही गरज आहे पर्याय नाही !
डोनाल्ड ट्रम्प यांनी Apple ला भारतात कारखाने उभारू नये असा सल्ला दिला, पण हा सल्ला Apple साठी आणि भारतासाठी काय परिणाम घडवून आणेल, याचा विचार करण गरजेच आहे. भारत ही Apple साठी फक्त एक उत्पादनाची जागा नाही, तर एक मोठी बाजारपेठ आहे. जर Apple ने भारतातून माघार घेतली, तर नुकसान Apple कंपनीचच होईल, भारताच नाही. भारतात कुशल कामगार, कमी खर्च आणि मोठी बाजारपेठ आहे, ज्याचा फायदा Apple ला होतो. ट्रम्प यांच हे विधान म्हणजे निवडणुकीच राजकारण आहे, पण Apple ने हे समजून घेतल पाहिजे की, राजकारणापेक्षा व्यवहार जास्त टिकतो. तुम्हाला काय वाटतं? भारतासारखा देश कोणत्याही कंपनीसाठी मॅन्युफॅक्चरिंग हब नाही, तर एक गरज आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद!